- आठवणी दाटतात -

ह्या मनाच्या सांदी कोपऱ्यात किती आशा लपल्या
आठवणी कितीदा भावना रुपात जपल्या

जेव्हा आठवणी दाटतात डोळे तेव्हा झरत
ह्याच मग चिरकाल साठून मनोमन रेंगाळत

जेव्हा हसलो मनापासून बालपणीच्या स्मृती
तेव्हां चिडलो तळापासून तारुण्याच्या कटू कृती

आता संध्याकाल सुरु झाली आठवणीच्या सोबतीने
“अरे, कितीदा पुरून उरलो” बोलून जातात गंमतीने

रंग माझा वेगळा म्हणून जीवन गाणे गाताना
“रंगल्या रात्री अशा” म्हणत डोळे पाणावताना

विसरलो जरी सर्व म्हणाले अमूर्त जीवन संचय बनत राहिल्या
कधी आठवणी, कधी साठवणी गोळा बेरीज बनत राहिल्या
- मृणाल देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा