नातं आणि गोतं
करायचं नसतं कधी रितं
ओंजळ भरून घेत राहायची
प्रत्येक वळणावर नाती जोडत जायची !
रक्ताचे असो वा जोडलेले
लांबचे असो वा जवळचे
नात्यांची आपलीच व्याख्या असते
जुळली मने तर काहीच परिभाषा नसते !
नातं हे एकटं नसतं
दोन व्यक्तींचं जुळलेलं मन असतं
नात्यात असावी सुख-दु:खाची जाणिव
मग उरणार नाही काहीच उणीव !
थोपलेली नाती कधीच टिकत नाहीत
जन्म सरतो पण मनं जुळत नाहीत
समज़ुन घेतलं तर ते नातं
नाहीतर सगळं रितं रितं !
काहि नाती दुरूनच सुंदर असतात
प्रत्यक्षात जवळ येताच विद्रुप होतात
नाती जपणं हे महत्वाचं काम
जन्मभर करत रहावं तरी लाभत नाही चारधाम !
सुटका होत नाही नात्यातुन
मनुष्य शेवटी गोत्यात येतो
जसा जिवनाचा सारांश मांडत जातो
तसा हा खेळ क्रुत्रिम वाटतो !
ईश्वराशी आपलं नातं जो जोडतो
तोच शेवटी सुखी होतो
मोह माया पाश सोडून
भगवंताशी एकरूप होतो !
ईश्वराशी नाते जोडेल जो
तो गोत्यात येत नाही
त्याच्या आयुष्याचा धडा रिता रहात नाही...
हेच नाते ब्रम्हांडामधे खरे...
बाकी सर्व आहे वरचे वरे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा